TOD Marathi

नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटांच्या सभांसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा बिहार दौऱ्यापासून सीमा प्रश्न आदी प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे देशातील युवा नेत्यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करणार आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली या संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती अशी बोचरी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
कालच्या सिन्नर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याचा आरोप होत असून मुख्यमंत्री स्वतः कर्तुत्वान असून त्यांना स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नसून ते भविष्यकाराचे भविष्य पाहतील राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आदर करावा लागतो कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील असेही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. कर्नाटकने महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगितला असून कर्नाटकच्या या दाव्या नंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रातील सीमा वरती भागातील ग्रामपंचायतीचा साधा वार्ड सुद्धा कर्नाटक मध्ये जाऊ देणार नाही राज्य सरकारसाठी हा प्रश्न संवेदनशील असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद सुरू असून वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोघी नेत्यांनी संयम ठेवावे. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून दोनी नेत्यांनी बोलताना संयम ठेवावा कुणी आरे केले तर दुसरा कारे करेल त्यामुळे सामाजिक जीवनात वागताना तारतम्य ठेवणे महत्त्वाचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मुद्दे नसून हा या पक्षात जाईल तो त्या पक्षात जाईल असे आरोप होत असतात. त्यामुळे या आरोपांना किती महत्व देणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचा गुलाबराव पाटील यांनी सांगितले. राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. निवडणुका ह्या प्रशासकीय बाब असून याचा कोणी काही अर्थ काढू नये जो तो पक्ष याचा आपल्यासाठी सोयस्कर पद्धतीने अर्थ काढत असतो.